मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
जेव्हा एका ऋषीने भगवान विष्णूच्या छातीवर मा’रली होती लाथ..यानंतर भगवान विष्णूनी जे केले आपण विचार पण करू शकत नाही..जाणून घ्या

पौराणिक कालखंडातील प्रसिद्ध ऋषी महर्षि भृगु यांची खूप महती सांगितली जाते. महर्षि भृगु यांचा प्रसिद्ध ग्रंथ भृगुसंहिता हा खूप प्रसिद्ध आहे. बहुतेक लोकांना माहिती आहे की,महर्षि भृगु यांनी भगवान विष्णूना छातीवर लाथ मा र ली होती, पण त्यानंतर काय झाले हे कोणालाच माहिती नाही. याशिवाय या घटनेमागील कारण शक्यतो कोणालाच माहिती नाही.

यामागील खरे कारण म्हणजे, त्या प्राचीन काळात जेव्हा भगवान शिवाच्या आज्ञेनुसार, समुद्रात एक राक्षस लपला होता, तेव्हा महर्षि भृगु यांनी पूर्ण महासागर गि ळं कृ त केले. परंतु महर्षि भृगुनी असे कार्य करण्यास काय कारण आहे. त्यावर म्हणले जाते की, त्यावेळी महर्षि भृगु हे सर्वात श्रेष्ठ ऋषी म्हणून, जगात ओळख निर्मान केली होती.

तरीही असे करण्याचे काही कारण किंवा अन्य कारण असावे. एकदा पृथ्वीवरील,माता सरस्वती यांच्यासह नदीच्या काठावर ऋषी-मुनी सत्संग सुरू होता. त्यामध्ये सारे ऋषी एकत्र येऊन, ध-र्माच्या विषयावर चर्चा करत होते की, ब्रह्माजी, महेश आणि श्री विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ आहे? याचा कोणताही निष्कर्ष न पाहता,

त्या सर्वांनी त्रिमूर्तीची परीक्षा पाहण्याचा निर्णय घेतला आणि ब्रह्माचा मुलगा महर्षि भृगु याला या कार्यासाठी नियुक्त केले. सर्वात आधी महर्षि भृगु प्रथम आपले पिता ब्रह्माजीकडे गेले. तसेच तिथे गेल्यावर त्यांना मान सन्मान दिला नाही किंवा त्यांची स्तुती केली नाही. हे पाहून ब्रह्माजी संतापले.

जास्त रागामुळे त्यानी त्याला शाप देण्याचे ठरवले पण तो आपला मुलगा असल्याचे समजून घेऊन मनातील संताप दडपणा खाली दडपला.पण ब्राह्मजीचा क्रोध महर्षि भृगु यांच्या लक्षात आला. तेथून महर्षी भृगु कैलासला गेले. तेव्हा ती भगवान महादेव यांनी पाहिले की भृगु येत आहे, म्हणून प्रसन्न होऊन आपल्या आसनावरुन उठून महर्षि भृगुना आदर दिला.

पण यावर भृगू ऋषीं महादेवाचा अपमान करत म्हणाले की, राहुदे महादेव ,तुम्ही माझ्या जवळ येऊ नका, कारण तुमची वेशभूषा फार घा ण आहे. हे महर्षि भृगुचे बोलणे ऐकून भगवान शिव संतापले. तसेच त्यानी त्यांचे त्रिशूल ऋषींना त्याला ठार मा-रण्यासाठी काढले, तेव्हा माता पार्वतीने त्याना शांत केले.

यानंतर भृगु मुनि वैकुंठ लोकाकडे गेले. त्यावेळी भगवान विष्णू व देवी विश्रांतीच्या अवस्थेत होते, माता लक्ष्मी भगवान विष्णूचे पाय दाबत होती. त्यावेळी तिथे येऊन महर्षि भृगुने भगवान विष्णूच्या छातीवर लाथ मा-रली. भक्त-वत्सल भगवान विष्णू लवकरच आपल्या आसनावरुन उठले आणि ऋषींपुढे नतमस्तक झाले आणि त्याच्या पायाजवळ लोटांगण घालून म्हणाले, “स्वामी! तुमच्या पायाला दुखापत तर झाली नाही ना?

यावर ऋषी महर्षि भृगु यांना लाज वाटली आणि त्यांनी भगवान विष्णूची माफी मागितली. त्यांना हा सर्व प्रकार सांगितला, तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की, जिथे ब्रह्माजी असतील तिथे सृष्टी निर्माण होते आणि त्या सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान विष्णू आणि जर तेथे एखादी निर्मिती असेल तर भविष्यात त्याचा विनाशही आवश्यक आहे म्हणून त्यासाठी शिवजी आहेत. या त्रिदेवाची उत्पत्ती ही एकमेकांनापासून झाली आहे, त्या मुळे सर्वांची शक्ती समान आहे. त्यामुळे त्रिदेवामधील कोणी कोणापेक्षा महान नाही.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.