मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
भगवान श्रीरामांनी पुथ्वीचा त्याग कसा केला ? जाणून घ्या पूर्ण घटना आणि त्यामागील रहस्य..

भगवान श्रीराम हिंदू ध-र्मातील थोर महाराजा आहेत. कारण भगवान श्रीराम हे भगवान विष्णू यांचा सातवा अवतार होता, अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौशल्या यांचे पुत्र होते. त्यांचा ज न्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला असे मानले जाते. प्रभु श्री राम सत्य वचनी व एक पत्नी व्रत व परम दयाळू होते.

भगवान श्री रामानी पृथ्वीवर 10,000 पेक्षा जास्त वर्षे राज्य केले. या प्रदीर्घ कारकीर्दीत भगवान राम यांनी अशी अनेक महान कार्य केली आहेत, त्यामध्ये त्यांनी हिंदू ध-र्माला गौरव दिला आहे. पण भगवान राम यांनी या जगापासून त्याग का केला ? असे काय कारण होते की त्यांना आपले कुटुंब सोडून विष्णू लोकांकडे परत जावे लागले? याची माहिती हिंदू ध-र्मातील काही महान ग्रंथात दिली आहे.

पद्म पुराणात सांगितले जाते की, राम राज्यात एके दिवशी एक वृद्ध संत भगवान श्री रामच्या दरबारात आला आणि त्यांना भगवान श्री राम यांना एकांतात चर्चा करण्याची विनंवणी केली. त्यावर प्रभू त्या संताला घेऊन एका खोलीत गेले आणि त्याचा धाकटा भाऊ भगवान श्री लक्ष्मण यांना दारात उभा राहायला सांगितले.

तसेच असे सांगितले की जर कोणी त्यांची चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला मृत्यूदंड दिला जाईल. भगवान श्रीरामाला आपल्या लोकात परत जावे, त्यांचा पृथ्वी वरील जीवन काळ संपला आहे, असे सांगण्यासाठी हे विष्णूच्या रूपातून काळदेव यांनी भगवान श्री रामाकडे पाठवले होते. तेव्हाच दरवाजावरती अचानक ऋषी दुर्वासा आले.

त्यांनी लक्ष्मणला सांगितले की भगवान रामांना भेटायचे आहे म्हणून जाण्याची विनंती केली. पण श्री रामांच्या आदेशामुळे लक्ष्मणने त्यांना तसे करण्यास मनाई केली. ऋषी दुर्वासा हे नेहमी त्यांच्या अत्यंत क्रोधासाठी ओळखले जातात. लक्ष्मणानं वारंवार नकार दिल्यानंतर ऋषी दुर्वासानी शेवटी भगवान श्री रामाला शाप देण्याचा इशारा दिला. आता लक्ष्मणची चिंता आणखीनच वाढली.

शेवटी माझ्या भावाच्या आज्ञेचे पालन करावे म्हणून लक्ष्मणने श्री रामाला शाप देण्यापासून वाचवले या मोठ्या ध-र्म-संकटात भगवान लक्ष्मण पडले होते. पण शेवटी त्यांनी निर्णय घेतला की भगवान श्री राम यांना त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे इजा होऊ नये, तसेच अशी इच्छा होती म्हणून त्याने स्वत: चे बलिदान देण्याचे ठरविले.

विचार केला की जर त्यांनी ऋषी दुर्वासाला आत जाऊ दिले नाही तर प्रभु श्रीराम यांना ऋषी दुर्वासाच्या शापाला समोरे जावे लागेल.
श्री रामाच्या आदेशाविरूद्ध ते स्वतः जर गेले तर त्यांना मृत्यूदंडाला सामोरे जावे लागेल. लक्ष्मणला हा पर्याय योग्य वाटल्यामुळे ते स्वतः पुढे जाऊन श्रीरामाच्या खोलीत गेले.

लक्ष्मणने चर्चेला बाधा आणताना पाहून भगवान श्रीरामही देखील ध-र्म संकटात पडले होते. एका बाजूला ते आपल्या निर्णयावर ठाम होते तर दुसर्‍या बाजूला असलेल्या भावाच प्रेम त्यांना अडवत होते. त्यावेळी श्री रामांनी आपल्या भावाला फाशीची शिक्षा देण्याऐवजी त्यांना राज्यातुन बाहेर जाण्यास सांगितले.

त्याकाळी देशातून बाहेर काढणे ही फाशीच्या शिक्षेइतकीच महत्त्वाची मानली जात होती. पण लक्ष्मण जो आपला भाऊ रामाशिवाय एक क्षणही जगला नाही त्याने हे जग सोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भगवान लक्ष्मण मुक्तीसाठी शरयू नदीवर गेले. ते नदीच्या आत जाताच ते मूळ रुपात अनंत शेषनागाच्या अवतारात प्रकट झाले आणि विष्णू लोकात निघून गेले.

जेव्हा आपल्या भावाच्या जाण्याने भगवान राम फार दु: खी झाले जसे रामांशिवाय लक्ष्मण नाही, तशाच प्रकारे भगवान रामांना लक्ष्मणशिवाय जगणे योग्य वाटले नाही. त्यानी पृथ्वीलोक सोडण्याचा विचार केला. जेव्हा भगवान रामने आपले राज्य त्यांची मुले तसेच भावाच्या मुलांना दिले आणि तेव्हा ते शरयू नदीकडे गेले.

श्रीराम पोहोचल्यावर शरयू नदीच्या अगदी आतल्या भागात गेले आणि अचानक गायब झाले. त्यानंतर काही काळानंतर भगवान विष्णू अवतारातून बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या भक्तांना दर्शन दिले. अशा प्रकारे श्री राम आपले मानवी रूप त्याग करून आपल्या मुळ विष्णू रूपात धारण होऊन वैकुंठ धामकडे प्रस्थान केले.

अशा प्रकारे भगवान श्री राम यांनी पृथ्वीवरून त्यांच्या मानवी जीवनाचा त्याग केला..

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.